आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
By Dada Bhagwan
2/5
()
About this ebook
मुलांच्या संगोपनात आई–वडिलांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आई–वडील असे प्रेमळ असावेत की त्यांचे प्रेम पाहून मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाही. आई–वडील मुलांना दटावत राहिले किंवा मारत राहिले तर मुले निश्चित त्यांचे ऐकणार नाही आणि उलट मार्गावर वळतील. आई–वडिलांच्या उच्च संस्कारामुळेच घरात आनंदमय, शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. काचे समान बालमनाला कसे हाताळायचे ? त्यांच्यावर उच्च संस्कार कसे घडवायचे ? तरुण पिढीसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार कसा करावा ? ह्याचे पूर्ण मार्गदर्शन ह्या संक्षिप्त पुस्तकात दिलेले आहे. त्याचबरोबर मुलांनाही तरुणवयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान कसे मिळवावे ? त्यांना स्वत:च्या आई–वडिलांसोबत कसा व्यवहार करावा ? आई–वडिलांच्या सेवेचे महात्म्य आणि त्यांचे उत्तम परिणाम कोणते ? ह्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा सुंदर मार्गदर्शन येथे संकलित केलेले आहे, जे निट समजून घेतल्याने आई–वडील आणि मुलांचा एकमेकांशी आदर्श व्यवहार नक्कीच संस्थापित करता येईल.
Related to आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
Related ebooks
पति-पत्नी चा दिव्य व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsमी कोण आहे Rating: 4 out of 5 stars4/5चमत्कार Rating: 0 out of 5 stars0 ratingsवाणी, व्यवहारात... Rating: 0 out of 5 stars0 ratingsकर्माचे विज्ञान Rating: 5 out of 5 stars5/5सत्य-असत्याचे रहस्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsगुरू-शिष्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-५ Rating: 0 out of 5 stars0 ratingsएडजेस्ट एव्हरीव्हेअर Rating: 0 out of 5 stars0 ratingsक्लेश रहित जीवन Rating: 0 out of 5 stars0 ratingsपैशांचा व्यवहार Rating: 0 out of 5 stars0 ratingsपाप: पुण्य Rating: 0 out of 5 stars0 ratingsभावना सुधारे जन्मोजन्म Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रतिक्रमण Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-२ Rating: 0 out of 5 stars0 ratingsअहिंसा Rating: 0 out of 5 stars0 ratingsसमजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य (संक्षिप्त) Rating: 3 out of 5 stars3/5वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी Rating: 0 out of 5 stars0 ratingsजगत कर्ता कोण? Rating: 0 out of 5 stars0 ratingsसेवा-परोपकार Rating: 0 out of 5 stars0 ratingsमृत्यूवेळी, आधी आणि नंतर Rating: 0 out of 5 stars0 ratingsआप्तवाणी-१ Rating: 0 out of 5 stars0 ratingsदान Rating: 0 out of 5 stars0 ratingsप्रेम Rating: 0 out of 5 stars0 ratingsत्रिमंत्र Rating: 0 out of 5 stars0 ratingsमानवधर्म Rating: 0 out of 5 stars0 ratingsजे घडले तोच न्याय Rating: 0 out of 5 stars0 ratingsनिजदोष दर्शनाने... निर्दोष Rating: 0 out of 5 stars0 ratingsचिंता Rating: 0 out of 5 stars0 ratingsभोगतो त्याची चुक Rating: 0 out of 5 stars0 ratings
Reviews for आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
1 rating0 reviews
Book preview
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार - Dada Bhagwan
दादा भगवान कोण?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले ‘दादा भगवान’ संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमााणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढायचे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!!
ते स्वत: प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण?’ ह्याबद्द्लची फोड करून देताना म्हणायचे की, ‘‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत. ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि ‘इथे’ संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वत: परमेश्वर नाही. माझ्या आत प्रगट झालेले ‘दादा भगवान’ त्यांना मी पण नमस्कार करतो.’’
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक
मी तर, काही लोकांनां माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा की नाही?
- दादाश्री
परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुस:या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)यानां आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आतापर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याचबरोबर पूज्य दीपकभाईनांही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षुंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
ह्या आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदा:या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानाची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानाची प्राप्ति करेल तेव्हाच हे शक्य आहे. प्रज्वलित दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
निवेदन
आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण ‘दादा भगवान’ह्या नावांने ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्वासाठी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या श्रीमुखातून निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. ह्यात त्यांचे उत्तम व्यवहारज्ञान आणि आत्मविज्ञान समाविष्ट आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्यावर त्याला आत्मसाक्षात्काराची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहेत.
ते ‘दादा भगवान’ तर त्यांच्या देहात असलेल्या परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवादामध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे की प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादांची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थपणे अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानाचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा’ आपल्याला गुजराथी भाषेत अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवादासंबंधी उणीवांसाठी आपले क्षमाप्रार्थी आहोत.
समर्पण
अनादि काळापासून, आई-वडीलांचा व्यवहार;
राग-द्वेषाचे बंधन आणि ममतेचा मार!
न सांगू शके, न सहन करु शके, करावे तरी काय?
कोणास विचारु, कोण दाखवेल त्याचे खरे उपाय?
गोंधळलेले राम, दशरथ आणि श्रेणिकरसाखे राजाही;
श्रवणाच्या मृत्युवेळी किंकाळी निघाली आई-वडीलांची!
लग्नानंतर विचारतो ‘गुरु’ पत्नीला पदोपदी;
हया त्रिकोणात सुचे नाही काय करावे खरोखरी !
आजची मुले गोंधळात आई-वडीलांमुळे;
अंतर झाले मोठे, जनरेशन गॅॅप मुळे!
मोक्षाचे ध्येय, त्याने पार करावा संसार;
कोण बनणार सुकाणी, नाव आहे मझधार!
आतापर्यंतच्या ज्ञानीनी दर्शविले वैराग;
मुल-बाळ असलेले अडकले, कसे व्हायचे वीतराग?
दाखविले नाही कोणी संसारासह मोक्षमार्ग;
कलियुगाचे आश्चर्य दादांनी दिले अक्रममार्ग!
संसारात राहून सुद्धा होता येते वीतराग;
स्वत:हून दादांनी प्रज्वलित केले चिराग!
त्या चिरागाच्या रोशनीने मोक्ष पावतात मुमुक्षु;
खरे जिज्ञासु प्राप्त करतात नक्की येथे दिव्यचक्षु!
त्या रोशनीचे किरण प्रकाशित झाले ह्या ग्रंथात;
आई-वडील मुलांचा व्यवहार सरळ होतो मार्गात!
दिव्याने दिवा प्रज्वलित होतो प्रत्येकाच्या आत;
जगास सर्मपित हा ग्रंथ, प्राप्ति करा झपाट्यात!
संपादकीय
कोणत्या जन्मात अपत्ये झाली नाहीत? आई-वडीलांशिवाय कोणाचे अस्तित्व संभव आहे का? सर्व भगवंताने सुद्धा आईच्या पोटीच जन्म घेतले होते.अशा प्रकारे आई-वडील आणि मुलांचा व्यवहार अनादि अनंत आहे. हा व्यवहार कशा प्रकारे आदर्श व्हावा, त्यासाठी सर्वच रात्रंदिवस प्रयत्न करताना दिसतात. त्यातही ह्या कलियुगात तर प्रत्येक बाबतीत आई-वडील आणि मुलांच्यामध्ये जे मतभेद दिसून येतात, ते पाहून लोकांचा थरकाप उडतो. सत्युगामध्ये सुद्धा भगवान राम आणि लव-कुश यांच्यातील व्यवहार कसा होता? ऋषभदेव भगवाननांपासून वेगळा संप्रदाय चालवणारे मरीची सुद्धा होते च ना? धृतराष्ट्रची ममता आणि दुर्योधनची स्वच्छंदता अनोळखी आहे का? भगवान महावीरच्या काळामध्ये श्रेणिक राजा आणि पुत्र कोणीक मुघलांची आठवण करुन देतात की नाही? मोघल बादशाह जगप्रसिद्ध झाले, त्यावेळी एकीकडे बाबर होते की ज्यांनी हुमायुचे जीवन वाचविण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याची अल्लाजवळ प्रार्थना केली होती, तर दुसरीकडे शहाजहांला तुरुंगात टाकून औरंगजेब स्वत: राजगादीवर बसला होता. तर भगवान राम वडीलांसाठीच वनवासात गेले होते. श्रवणाने आई-वडीलांना कावडीमध्ये बसवून त्यांना तिर्थयात्रा घडवली (मुखपृष्ठ) असे राग-द्वेषाच्या झोक्यावर हेलकावे घेत आई-वडील आणि मुलांचा व्यवहार प्रत्येक काळात होता. वर्तमानात द्वेषाचा व्यवहार विशेष करुन पाहण्यात येत आहे.
अशा वेळी समतापूर्वक आर्दश व्यवहार करुन निघून जाण्याचे मार्ग अक्रम विज्ञानी परम पूज्य दादाभगवानां(दादाश्रीं)च्या वाणी द्वारे येथे प्ररुपित झाले आहे. आजच्या युवावर्गाची मानसिकता पूर्णपणे जाणून, त्यांना जिंकण्याचा मार्ग दाखवला आहे. परदेशस्त भारतीय आई-वडील आणि मुलांची, दोन देशामधील भिन्न भिन्न संस्कृतीमध्ये, जीवन जगण्याच्या कठीण समस्यांचे सुंदर निराकरण प्रसंगानुरुप बातचीत करुन सांगितले आहे. एक आदर्श जीवन जगण्यासाठी हे मार्गदर्शन वरिष्ठ वाचकांना आणि युवकवर्ग यांना खूप-खूप उपयोगी सिद्ध होणार.
प्रस्तुत पुस्तक दोन विभागात प्रकाशित होत आहे.
पूर्वार्ध : आई-वडीलांचा मुलांप्रति व्यवहार.
उत्तरार्ध : मुलांचा आई-वडीलांप्रति व्यवहार.
पूर्वाधात परम पूज्य दादाजींचे अनेक आई-वडीलांसोबत झालेल्या सत्संगांचे संकलन आहे. आई-वडीलांच्या अनेक मानसिक व्यथा दादाश्रींसमोर वळोवेळी व्यक्त झाल्या होत्या आणि त्यावर दादाश्रींने अचूक उपाय सांगितले आहे ज्यामुळे आई-वडीलांना स्वत:च्या व्यवहारिक समस्यांसाठी समाधान मिळतात. तसेच त्यांना आपले व्यवहारिक जीवन सुधारण्यासाठी किल्ल्याही मिळतात. त्या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनात मुलांसोबत व्यवहार करताना येणा:या अडचणींचेही अनेक समाधान प्राप्त होतात. जेणे करुन संसार व्यवहार सुखमय परिपूर्ण होवो. आई-वडील आणि मुलांमध्ये जे रीलेटीव संबध आहेत, तात्विक दृष्टिने ज्या ज्या वास्तविकता आहेत त्या सुद्धा ज्ञानी पुरुष समजावतात, जेणे करुन मोक्षमार्गावर पुढे जाण्यासाठी आई-वडीलांची मूर्छित अवस्था दूर होते व त्यांची जागृति उमलत जाते. हे सर्व काही पुस्तकाच्या पूर्वाधात संकलित करण्यात आले आहे.
आणि उत्तरार्धमध्ये परम पूज्य दादाश्रींचे लहान मुलं आणि तरुण मुला-मुलींसोबत झालेल्या सत्संगांचे संकलन आहे. ज्यात मुलांनी आपल्या जीवनातील व्यक्तिगत समस्यांवर समाधान प्राप्त केले आहेत. आई-वडीलांसोबत कशाप्रकारे व्यवहार करावा ह्याचीही उत्तम समज प्राप्त होत आहे. विवाह करण्या संबंधीही अशी उत्तम समज प्राप्त होत आहे की ज्या मुळे तरुणपिढी आपल्या जीवनात सत्य समजून व्यवहाराचे पूर्णपणे निराकरण करु शकेल. मुलांना आपल्या आई-वडीलांच्या सेवेचे महात्म्य आणि सेवा करण्याचा परिणाम समजावे ह्या साठी दिलेले मार्गदर्शन उत्तरार्धात समाविष्ट झाले आहे.
- डॉ. नीरूबहन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद
प्रस्तावना
आई-वडील मुलांचा आहे व्यवहार;
अनंतकाळापासून, तरीही आले नाही पार!
मी वाढवले, मी शिकवले सांगू शकत नाही
तुम्हास कोणी शिकवले? तेव्हा काय म्हणाल?
अनिवार्य आहेत कर्तव्य सर्व मुलांप्रति;
तुझे ही करणारे होतेच ना तुझे वडील!
उगीच दटावून देऊ नको संताप;
मोठी होऊन मुले देतील तुला मनस्ताप!
अशी मुलं हवीत ही इच्छा तुम्ही करत;
स्वत: दोघे कसे भांडतात ते तर नाही बघत!
आई मुळा आणि बाप असेल गाजर !
मुलं सफरचंद कशी होतील खरोखर?
एका मुलाच्या संगोपनाची जबाबदारी;
भारताच्या पंतप्रधानाहून नक्कीच भारी!
तुझ्याहून अधिक पाहिली मी दिवाळी;
तुम्ही पाहिली पणतीत आम्ही तर वीजेत, मुले म्हणाली!
आई-वडीलांची भांडणे बिघडवते बालमानस;
गूंतागूंतीत मूले फसतात मानतात त्यांना बोगस!
धमकावून नाही समजत आजची मुले कधी;
प्रेमानेच होणार उज्जवल एकवीसावी सदी!
मारले, रागावले तरीही घटत नाही प्रेम जिथे;
प्रेमाच्याच प्रभावाने मुले होतात महावीर तिथे!
नवीन पिढी आहे हेल्दी माईन्डवाली;
भोगवादी असेल तरी नाहीत कषायवाली!
क्रोधाचा प्रतिघोष नाही विसरत मुले;
बापाहून वरचढ क्रोधी होतात मुले!
घरोघरी प्राकृतिक शेत होते सत्युगात;
निरनिराûया फूलांच्या बागा आहेत कलियुगात!
माळी बनाल तर बाग सुंदर शोभेल;
नाहीतर बिघडून कषायात डूबेल!
करु नये कधी मुलींवर शंका;
नाहीतर ऐका बरबादीचा घंटा!
वारसाहक्कात मुलांना देणार केवढे;
तुम्हाला मिळाले वडीलांकडून तेवढे!
जास्त द्याल तर करेल उधळपट्टी;
दारूड्या बनून