Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...
दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...
दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...
Ebook372 pages2 hours

दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

जरी ह्या प्राचीन सरावामुळे यहूदी लोकांना अलौकिक संपत्ति प्राप्त झाली आहे तरी, अनेक लोक दशमांशाच्या संकल्पनेशी संघर्ष करतात. ह्या पुस्तकामध्ये बिशप डग हेवर्ड मिल्स दशमांश देण्याने संपत्ती निर्मितीचे सिद्धांत आणि समृद्धीचे चमत्कार ह्यांना कसे मूर्तस्वरूप प्राप्त होते हे शिकवितात. डग हेवर्ड मिल्स द्वारा लिखित ह्या अतिउत्कृष्ट खंडाचा आनंद घ्या.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354523
दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...

Related ebooks

Reviews for दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात...

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दशमांश न देणारे ख्रिस्ती लोक गरीब का होतात... - Dag Heward-Mills

    १. दशमांश न देणारे ह्यासाठी गरीब होतात की त्यांच्याकडे कापण्यासाठी कांहीच नसते.

    कारण ते वा-याची पेरणी करून वावटळीची कापणी करितात; त्याला ताट नाही; अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकितील.

    होशेय ८:७

    समृद्धीच्या सर्वांत मूलभूत स्वरूपामध्ये पेरिणी करणारा व नंतर कापणीचा संचय करणारा ह्याचा समावेश असतो. तुम्ही तुमचा दशमांश न दिल्यास तुम्ही पेरिणी आणि कापणीच्या ह्या मूलभूत तत्वापासून वेगेळे केले जाता. जेव्हा तुम्ही तुमचा दशमांश देत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या आर्थक बाबींवर कुडाळ मारता कारण तुम्ही समृद्धीच्या मूलभूत गोष्टींस काढून टाकता.

    २. दशमांश देणारे गरीब ह्यासाठी होतात कारण ते त्यांच्या जीवनावर आशीर्वादांस आकर्षित करीत नाहीत.

    सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरांत अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारांत आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हांकरिता वर्षितो की नाही ह्याविषयी माझी प्रतीति पाहा.

    मलाखी ३:१०

    दशमांश देणे हा विविध प्रकारच्या आशीर्वादांना आकर्षित करतो कारण देवाचे वचन तसे सांगते. जो व्यक्ती आशीर्वादित आहे त्यावर कृपादृष्टी असून त्याला मदत केली जाते. पृथ्वीवरील आपले जीवन हे फार कठीण आहे. फारोने जेव्हा याकोबाला विचारले तेव्हा याकोबाने असे म्हटले होते, "याकोब फारोस म्हणाला, ‘माझी जीवितयात्रा एकशेतीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझी वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोंचले नाहीत. उत्पत्ति ४७:९).

    मनुष्याच्या आयुष्याचे दिवा अल्प असून फार कठीण आहे असे ईयोबाने देखील म्हटले. तुमच्या जीवनावर एक विशिष्ट शाप असल्याशिवाय देखील तुम्हांला अनेक समस्यां आणि कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. जेव्हा तुम्ही तुमचा दशमांश देत नाही तेव्हा ह्या जीवनाच्या सध्याच्या समस्यां सोडविण्यासाठी कोणतेही आशीर्वाद उपलब्ध होत नाहीत. जर तुमच्या दु:खदायक अस्तित्वाविषयी आशीर्वादाचे वचन घोषित केले नाही तर तुम्ही आयुष्यांत चांगले कसे करू शकता? जर तुम्ही दशमांश देत नसाल तर तुमच्या जीवनातील वाढत्या गरिबीबद्दल तुम्ही आश्चर्य करू नका. जे आशीर्वाद समृद्धीबरोबर कष्ट देत नाही.ते मुबलक प्रमाणात दशमांश देणा-यांना प्राप्त होतात.

    ३. दशमांश न देणारे गरीब असतात कारण ते शापित असतात

    मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे; असे असून त उम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे यासंबंधाने

    तुम्ही शापाने शापग्रस्त आहा, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे

    मलाखी ३:८-९

    जे लोक दशमांश देत नाहीत त्यांच्यासाठी एक विशिष्ट शाप आहे. ह्या जगांत असलेल्या पंचवीस शापांपैकी तो एक शाप आहे. आदामाद्वारे आपल्याला प्राप्त झालेल्या पुष्कळश्या विद्यमान शापांमध्ये फक्त समाविष्ट होण्यासाठी दशमांश न देणा-यावरील शाप येतो. नोहा आणि इतर पिढ्यां. दशमांश न देणा-या लोकांवर जो शाप असतो तो तुमच्या आईबापांनी आणि पूर्वजांनी त्यांच्या स्वत:वर आणि त्यांच्या वंशजांवर ओढवून घेतलेल्या शापांशी सहक्रियाशील असतो. जे लोक त्यांच्या कोणत्या ना कोणत्या त्यांच्या कृत्यांमुळे शापित झालेले आहेत अशा लोकांचे आपण जवळजवळ सर्वच जण वंशज आहोत.

    माझे पूर्वज गुलामांचे व्यापारी होते हे जेव्हा मला माहित पडले तेव्हा मी फारच चिंतेत पडलो होतो. मला असे कळून अल की माझ्या बापाच्या गावासमोर एक भव्य किल्ला बांधलेला होता ज्याचा उपयोग गुलामांचा व्यापार करण्यासाठी केला जात असावा. हे उघड होते की ज्याला बंदिवान म्हणून विकले गेले नव्हते अशा कोण्या एका व्यक्तीचा मी वंशज होतो. आणि म्हणून ज्याने त्याच्या भावाला विकले होते अशा एका व्यक्तीचा मी वंशज होतो अशी शक्यता होती. तुमच्या भावाला विकणे ह्यामुळे खचितच तुमच्या कुटुंबावर शाप ओढवणारच. ह्याचे तुम्हांला कधी आश्चर्य वाटले का की ज्या स्थळांनी कांही कमी मोलाच्या वस्तूंसाठी आणि आराशांसाठी त्यांच्या भावांना विकले ती स्थळे जगातील सर्वांत दारिद्र्य ग्रस्त भाग का आहेत?

    तुम्ही दशमांश न दिल्यास तुमच्या जीवनावर अतिरिक्त शाप लादण्यांत येतात. तुम्ही अगोदरच आदामाच्या शापाखाली त्रस्त झाले आहात हे विसरू नका. तुम्ही जर हामाचे वंशज आहात तात तुम्ही हामाच्या शापाविरूद्ध सुद्धा संघर्ष करीत आहात.

    प्रिय मितरा, तुम्ही किती काळ अधिक सहन करू शकता? आशीर्वाद करण्याची आता ही वेळ नाही का? ह्या भयंकर शापांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला दशमांश देणा-याच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे! तुम्ही जसा तुमचा दशमांश देण्याचा नकार करता तस तसे तुम्ही गरीब होत जाता ह्यांत कांही आश्चर्य आहे का?

    ४. दशमांश न देणारे अधिक गरीब होत जातात कारण ते विध्वंसक नेहमी त्यांची संपत्ती खाऊन टाकतात.

    तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणा-यांस मी तुम्हांसाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षालताचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

    (मलाखी ३:११)

    नाश करणा–याला जेव्हा धमकाविले जाते, तुम्ही एवढे कांही कमावू शकत नाही परंतु तुमची बादली लवकरच भरून वाहू लागेल.

    प्रिय मित्रा, जेव्हा तुम्ही तुमचा दशमांश देता तेव्हा देव हे करण्याचे वचन देतो. आजच गरीबी दूर हटा आणि नाश करणा-याला धमकाविण्याच्या आशीर्वादाला प्राप्त करा. लोक त्यांच्या मध्यवयीन कालामध्ये लठ्ठ आणि जाडे का होतात ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे ला? ब-याचदा ते जास्त खात नाहीत.

    खरे पाहिल्यांस, मध्यवयीन लोक त्यांच्या आहारांत बरीच काटछाट करतात तरीही त्यांचे वजन वाढत राहते. त्यांचे वजन वाढण्याचे कारण काय? जस जसे लोक वृद्ध होत जातात त्यांची चयापचय क्रिया मंद होऊ लागते. दुस-या शब्दांत सांगायचे म्हणजे चरबीला जाळण्याची ज्वलनक्रियेची गती मंद होते. जर शरीरातील चयापचयाची अग्नी एका दिवसाला दहा घटक चरबीला जाळते, तर तिच्यामध्ये ती पाच घटक जाळू शकते.

    अचानक, तुमच्या शरीरातील उरलेली ती पांच घटक चरबी रोज वाढते. जवळजवळ कोणत्याही प्रयत्नाशिवाय तुमचे वजन वाढू लागते आणि तुम्ही विस्तृत आणि विस्तीर्ण होऊ लागता. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही व्यक्तीचे वजन त्यांच्या आकारावरून ओळखू शकता. जस जसे तुम्ही वृद्ध होऊ लागता तुमची चयापचय क्रिया घटु लागते, (नाश करणा-याला धमकाविले गेले) आणि वजन वाढू (समृद्धी होऊ) लागते.

    खरेच, दशमांश न देणा-यांच्या जीवनांत असलेल्या विध्वंसकास न तपासले गेल्यामुळे ते गरीब होत जातात

    ५. दशमांश न देणारे गरीब होत जातात कारण त्यांच्या शेतातील फळांचा सतत नाश केला जातो.

    तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणा-यांस मी तुम्हांसाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षालताचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

    (मलाखी ३:११)

    तुम्ही जे कांही मिळविले होते ते अपव्यय, निष्काळजी व्यवस्थापन, दुर्लक्ष, अग्नी, अपघात, दंगल, चोरी आणि युद्धामुळे सुद्धा त्याचे जे कांही मूर्खपणाचे नुकसान झाले ते जरी दु:खदायक असले तरी ते खरोखर नाश करणा-याचेच कार्य आहे.

    दशमांश देण्याच्या आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद म्हणजे विध्वंसकाला धमकाविणे होय. विध्वंसक हा नाश करणा-याचा भाऊ आहे. विध्वंसक आणि नाश करणारा ह्यामध्ये फरक हा आहे की विध्वंसक अतिशय वेदना आणि दु:खदायकरीतीने तुमची संपत्ती काढून घेतो. विध्वंसक कार्य करीत असतांना पाहणे हे फारच दु:खदायक असते कारण तुम्ही अनुभवत असलेल्या नुकासानामध्ये कांहीच अर्थ नसतो. तुम्ही दशमांश देण्यास सुरू करा आणि पाहा त्या विध्वंसकाला काढून टाकण्याचे देवाने वचन दिले आहे.

    ६. दशमांश न देणारे गरीब होतात कारण ते त्यांना कापणी करण्याची संधी मिळण्यापूर्वी त्यांचे फळ गमावतात.

    तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणा-यांस मी तुम्हांसाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षालताचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

    मलाखी ३:११

    दशमांश न देणारे गरीब होतात ह्याचे दुसरे कारण म्हणजे ते त्यांच्या पिकाची त्यांना कापणी करण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्यांच्या पिकाचे नुकसान होते. दशमांश न देणा-यांवर त्यांचे पिक यशस्वी न होण्याचा त्यांच्यावर शाप असतो. तुम्ही जे कांही पेरले आहे त्या संबंधित आणि योग्य अयशस्वी पिकाची अयशस्वी कापणी होते.

    कोणीतरी आत्मविश्वासाने असे शिकविले की तुम्ही जर कठोर परिश्रम केले तर श्रीमंत व्हाल. त्या व्यक्तीने पुढे असे सांगितले की, जे लोक श्रीमंत नाहीत ते मेहनत करीत नाहीत. विकसनशील देशातील लोकांनी त्यांच्या शर्टाचे हात वर सावरून काम करण्यांस सुरुवात केली पाहिजे म्हणजे समृद्धी त्यांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.

    परंतु जर तुम्ही तुमच्या सभोवती बघाल तर तुमच्या लक्षांत येईल की कठोर परिश्रम करणारे कितीतरी लोक अजूनही श्रीमंत झाले नाहीत. बारा बारा तास पाठ मान एक करून काम करणारे लोक प्रत्यक्षांत फारच थोडे कमावतात. आणि कांही मैल दूरवर असलेले लोक दिवस भरातून केवळ एकच तास काम करतात आणि तरीही ते लक्षाधिपती होतात हे तुम्हाला आढळून येईल.

    कठोर परिश्रम हे तुम्हांला समृद्धीकडे न्यावयास पाहिजे हे खरे आहे परंतु अनेक प्रकरणामध्ये तसे कांही घडते हे दिसून येत नाही. घाना ह्या देशामधील एक चांगला ड्रायव्हर महिन्याला जितके कमावतो त्यापेक्षा एकोणीस टक्के जास्त स्वीडेन ह्या देशातील ड्रायव्हर कमावतो. हे असे का? तेव्हड्याच तासाच्या कामासाठी, त्याच कामासाठी घाना येथील ड्रायव्हरला का बरे वेतन मिळत नाही? एखादा शंभर बियां पेरतो व त्याला शंभर टक्के पीक मिळते आणि दुसरा शंभर बियां पेरतो पण त्याला केवळ तेवीस टक्केच पीक मिळते असे का?

    येथे तुम्ही समजू शकता की पीक हे प्रत्यक्षांत किती अपयशी आहे. अपयशी पीक हे एखाद्याने जे कांही पेरले होते त्या संबंधित योग्य असे पीक त्याला मिळण्यास अपयश आले. असल्या अपयशी पिकाचा अनेक लोक अनुभव घेतात.

    नेहमी ज्या व्यक्तीला कमी पीक आल्याचा अनुभव येतो ते पीक कमी आल्याचे कारण समजणे त्याच्या शक्ती पलीकडे असते. पाच मैल दूर असलेल्या अमेरिकेच्या सीमेपलीकडे असलेल्या मनुष्याच्या तुलनेत मेक्सिको येथील कठोर परिश्रम करणा-या मनुष्याला एवढी थोडी मिळकत का मिळते? मेक्सिको येथील व्यक्ती जेवढा वेळ आणि प्रयत्न करतो तेवढाच वेळ आणि प्रयत्न अमेरिकेतील भूमीवरील व्यक्ती सुद्धा करतो परंतु त्याला एकोणीस पट जास्त लाभ मिळकत मिळते? या पेचाची कारणे शोधणे आणि उपाय काढणे हे व्यक्तीच्या क्षमतेच्या पलीकडे आहेत. परंतु सर्वसमर्थ देवाने दशमांश देणा-याला पिकाच्या अनौपचारिकपणे होणा-या नाशापासून बचाव करण्याचे वचन दिले आहे. कापणीच्यापूर्वी तुमच्या फळाचा तो कधीच नाश होऊ देणार नाही.

    ख-या समृद्धीची गुरुकिल्ली म्हणजे दशमांश देणे आहे ह्यांत कांही आश्चर्य आहे का? त्यांच्या कमाईचा दहावा हिस्सा देवापासून दूर ठेवण्याने दशमांश न देणारे गरीब होतात हे पाहून तुम्ही आश्चर्य करता का?

    देवाच्या साहाय्याशिवाय तुम्ही काहीहि करू शकता का? देवाच्या साहाय्याशिवाय तुम्ही कोठवर पुढे जाऊ शकता? तुम्ही दशमांश देण्याचे सुरू करण्याची हीच वेळ आहे जेणेकरून तुम्हांला प्राप्त होणारा लाभ हा तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकण्याअगोदर नष्ट होऊ नये.

    अध्याय २

    दशमांश न देणा-यावर येणारे शाप

    दशमांश न दिल्याने कांही अनेक विविध शाप सक्रीय होतात. कांही लोकांचा असा समज आहे की दशमांश न दिल्याने केवळ मलाखीचा शापच सक्रीय होतो. परंतु दशमांश न दिल्याने मलाखीच्या शापापेक्षाही अधिक शाप सक्रीय होतात. ज्या शापांचे विनाशकारी प्रभाव आहेत असे अनेक विविध शाप सक्रीय होतात आणि त्याबद्दलच हा अध्याय चर्चा करणारा आहे.

    तरीही शाप आहे तरी काय? शापाची अनेक प्रकारे व्याख्या दिली जाऊ शकते. शापाच्या ह्या बारा व्याख्या शापाच्याखाली असणे म्हणजे काय हे समजण्यास तुम्हांला मदत करील. बहुविध शापांखाली असणे म्हणजे काय ह्याची मी कल्पना करू शकत नाही.

    शापाच्या बारा व्याख्या

    १. शापित व्यक्ती तो आहे की जो सतत निराशेचा नुभव घेत असतो.

    २. शापित व्यक्ती तो आहे की जो प्रत्येक गोष्टींमध्ये मागे आणि खाली असतो.

    ३. शापित व्यक्ती तो आहे की ज्याच्यावर एक विशिष्ट शाप लादलेला असतो.

    ४. शापित व्यक्ती तो आहे की जो रहस्यमय विचित्र घटनांसह त्रस्त असतो.

    ५. शापित व्यक्ती तो आहे की जो सतत अपयशी असतो.

    ६. शापित व्यक्ती तो आहे की ज्याला सतत नाकारले जाते आणि बाजूला सारले जाते.

    ७. शापित व्यक्ती तो आहे की ज्याला कधीहि निवडले जात नाही.

    ८. शापित व्यक्ती तो आहे की जो आपले जीवन सकारात्मक दिशेने पुनर्निर्देशित करण्यास असमर्थ असतो.

    ९. शापित व्यक्ती तो आहे की जो गंभीर स्वरूपाच्या महत्वाच्या माहितीकडे दुर्लक्ष करतो.

    १०. शापित व्यक्ती तो आहे की जो सतत वाईट पर्यायास नियुक्त केला जातो.

    ११. शापित व्यक्ती तो आहे की ज्याचा फक्त वाईट लोकांशीच सामना होतो.

    १२. शापित व्यक्ती तो आहे की ज्याची सुरुवात कशाहि प्रकारची का असेना तो नेहमी शेवटचा असतो आणि अपयशी ठरतो.

    दशमांश न देणा-याच्या पाठोपाठ आठ गोष्टीं लागतात

    १. जे लोक दशमांश देत नाहीत ते मलाखीच्या शापांनिशी शापित आहेत

    मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला थकविले आहे; असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे यासंबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहां, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे.

    मलाखी ३:८-९

    दशमांश न देणा-यावरील बायबलमधील एक विशिष्ट शाप म्हणजे मलाखीचा शाप होय. ह्या शापामध्ये तुमच्या जीवनांत नाश करणारा जो विध्वसंक त्याला मोकळे करणे आणि अपयशी पीक देणे ह्याचा समावेश आहे. नाश करणारा जो विध्वंसक आणि अपयशी पीक ह्याबद्दल मागील अध्यायामध्ये चर्चा केली गेली आहे.

    २. जे लोक दशमांश देत नाहीत ते चोरावर असलेल्या शापाने शापित असतात.

    चोरी करणा-यावर असलेल्या दोन मनोरंजक शापांबद्दल बायबल आपल्याला दाखविते. एक सर्वसामान्य शाप आहे जो देवाने सर्वसाधारणपणे चोरांवर घोषित केला आहे. आणि दुसरा एक विशिष्ट शाप स्वत: देवापासून चोरी करणे ह्यावर आहे.

    तुमची चोरी करणा-याला शाप देण्याची आवश्यकता नाही कारण जो कोणी चोरी करतो त्याच्यावर एक सर्वसाधारण शाप असतोच हे तुम्हांला ठाऊक आहे का? चोर हा अगोदरच एक शापित व्यक्ती असतो! प्रत्येक चोरावर असलेल्या शापाबद्दल जख-या संदेष्ट्याच्या पुस्तकांत तो घोषित केला आहे.

    त्या शापामध्ये, प्रभू असे घोषित करीत आहे की तो चोराच्या घरामध्ये प्रवेश करून इमारतीचे लाकूड आणि दगडे ह्यांसाहित सर्वकांही भस्म करून टाकील. हा शाप पूर्ण झाल्यानंतर चोराजवळ कांही सुद्धा उरणार नाही, त्याला राहावयास घर सुधा नसणार! चोर लाखों रुपयाची चोरी करू शकतो परंतु हा शाप त्या लाखों रुपयांना जाळून राख

    Enjoying the preview?
    Page 1 of 1