Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही
ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही
ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही
Ebook391 pages4 hours

ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

समृद्धी आणि संपत्ती नियंत्रित करणारे धक्कादायक तत्व येशू ख्रिस्त प्रकट करतो. ज्याला आहे त्याला दिले जाईल! हे ऐकण्यास किती अयोग्य वाटते! आणि तरीसुद्धा, ही वास्तविकता आहे जी आपल्याला दररोज आपल्या समोर घडताना दिसते. हे पुस्तक, थोड्या प्रमाणात समजले गेलेले वरील वचन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. डॅग हेवर्ड -मिल्स द्वारा लिखित या नवीन पुस्तकाचा अभ्यास करताना तुम्हांला समृद्धीच्या गूढ गोष्टींचे महान अंतरंग प्राप्त होईल.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354226
ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही

Related ebooks

Reviews for ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही - Dag Heward-Mills

    अध्याय १

    ज्याला आहे आणि ज्याला नाही काय हे खरे आहे?

    कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. 

    मार्क ४:२५

    वरील वचन ऐकण्यासाठी विचित्र वाटत असले तरी ते खरे असणे आवश्यक आहे! काय अनुचित वाटणारे वचन आहे! ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्याच लोकांना अधिक पैसे का मिळाले पाहिजे? ज्यांच्याजवळ थोडेच पैसे आहेत त्यांच्याकडून ते देखील का काढून घेतले जावे? वास्तविक जीवनात असे का आहे की ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच अधिक मिळते? आपल्या अपेक्षेच्या विपरीत गोष्टी घडतात असे का होते?

    जरी हे शास्त्रवचन ऐकायला अयोग्य वाटत असले, तरी हे दोन कारणांमुळे खरे आहे. ते खरे आहे कारण ते येशूने म्हटले आहे. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु त्याची वचने नाहीशी होणारच नाहीत (मत्तय २४:३५). येशूचे शब्द हे कधीही न बोलले गेलेले सर्वात शक्तिशाली शब्द आहेत.

    हे शास्त्रवचन खरे आहे याचे दुसरे कारण म्हणजे ते आपण आपल्या सभोवताली पाहतो. प्रत्येकाला अधिक हवे आहे पण प्रत्येकाला जास्त मिळत नाही. त्यामुळे कोणाला खरोखर अधिक मिळते?

    आपल्या सर्वाची अशी अपेक्षा असते की ज्यांच्याकडे फारसे काही नाही त्यांना समानतेस आणले पाहिजे. प्रत्येकाला किमान मूलभूत गोष्टी मिळाव्या असे आपण इच्छितो. तरीही, जीवन आणि इतिहास आपल्याला दाखवून देतो की ज्याला आहे त्यालाच सर्वकाही प्राप्त होते. आपल्या आजूबाजूला बघा आणि पाहा की ज्यांच्याकडे फारसे काही नाही ते त्यांच्याकडे जे थोडेफार आहे ते देखील गमावत आहेत! आम्ही सर्व येशूचे शब्द खरे आहेत हे पाहू शकतो.

    हे पुस्तक ऐकायला विचित्र वाटणाऱ्या  वाचनाविषयी आहे. हे ऐकायला विचित्र वाटणारे वचन शारीरिक आणि आध्यात्मिक या दोन्ही गोष्टींना लागू होते याचा शोध तुम्ही या पुस्तकात घ्याल. चला पाहूया की ज्याला आहे याचा अर्थ काय आहे.

    ज्याच्याकडे आहे - भौतिक गोष्टी

    १. ज्याकडे आहे पैसा, घरे आणि कार त्याच्याकडे अधिक पैसा, अधिक घरे आणि अधिक कार असतील.

    श्रीमंत लोक (ज्याला आहे ) ते अधिक श्रीमंत होतात आणि त्यांना कधीच कसलीच उणीव नसल्याचे दिसून येते तर गरीब दिवसेंदिवस अधिक गरीब होत जातात.

    अफ्रिका, जगातील सर्वात गरीब उपखंड हा जगातील एकमात्र असा भाग आहे जो गेल्या तीस वर्षांमध्ये सातत्याने अधिक गरीब झाला आहे. अमेरिका आणि युरोप, जे आधीच श्रीमंत आहेत, ते अधिक श्रीमंत झाले आहेत आणि त्यांचे सोन्याचे साठे, त्यांचे ऐश्वर्य आणि त्यांची मालमत्ता वाढली आहे. दुसऱ्या बाजूने अफ्रिका, जिला पायाभूत सुविधांची जास्त गरज आहे, तिने नागरी युद्धे आणि आदिवासी संघर्षामुळे त्याच्या छोट्या पायाभूत सुविधांचा देखील नाश केला आहे.

    हे स्पष्टच आहे की ज्या व्यक्तीने एक घर बांधले आहे तो आणखी घरे बांधण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीने घर बांधले नाही तो भविष्यात घर बांधेल याची शक्यता कमी आहे. ज्या व्यक्तीकडे घर नाही तो त्याचे सध्याचे निवासस्थान गमावण्याची अधिक शक्यता असते. ज्या व्यक्तीने घर बांधले नाही त्याला त्याच्या घर मालकाकडून बाहेर काढले जाण्याची जास्त शक्यता आहे.

    ज्यांच्याकडे मोटारगाड्या आहेत ते भविष्यात अधिक मोटारगाड्यांचे मालक होण्याची अधिक शक्यता असते. गरीब लोक ज्यांच्याकडे स्वतःच्या मोटारगाड्या नाहीत परंतु नेहमी बस आणि टॅक्सीमधून प्रवास करतात ते येणाऱ्या काही वर्षांत बस आणि टॅक्सीमधून प्रवास करत असण्याची शक्यता जास्त असते.

    २. ज्याला नोकरी आहे त्याला नोकरीचे अधिक प्रस्ताव मिळतील.

    ज्यांच्याकडे नोकरी आहे, त्याला जास्त नोकऱ्या मिळण्याची अधिक शक्यता आहे. जर तुम्ही गोल्डन ट्यूलिप हॉटेलमध्ये मुख्य आचारी आहात तर तुम्हांला न्यू शेरेटन हॉटेलकडून त्यांचा मुख्य आचारी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने, ज्या व्यक्तीने स्थानिक कॅटरिंग शाळेमध्ये मुख्य आचारी होण्याचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला आहे त्याला न्यू शेरेटन हॉटेलकडून नोकरीची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. ज्याच्याकडे नोकरी आहे त्याला आणखी एक नोकरी असण्याची शक्यता आहे. बँकेच्या कोषाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या बॅंकेकडून आणखी चांगल्या नोकरीचा प्रस्ताव दिला जाण्याची अधिक शक्यता असते. दु:खाची गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तीने विद्यापीठातून दोन पदव्या मिळवलेल्या व्यक्तीला बँकेकडून प्रस्ताव मिळण्याची शक्यता कमी आहे. या व्यक्तीला परिश्रमपूर्वक नोकरी शोधावी लागेल आणि अनेक वेळा त्याला नाकारले जाईल.

    ३. ज्याला मुल आहे त्याला आणखी मुले असतील.

    ज्या लोकांना मुले आहेत ते सहजतेने पुढच्या मुलाला जन्म देतात. गर्भधारणा झाली म्हणून नाखूष झालेल्या माता सापडणे हल्ली सामान्य आहे. अशा लोकांना आधीच अनेक मुले असतात. दु:खाची गोष्ट म्हणजे, ज्यांना एकही मुल नाही ते किमान एक मुल असावे म्हणून संघर्ष करतात. हा एक दु:खी विरोधाभास आहे पण ते आपल्या जगाचे एक वास्तव आहे.

    ४. ज्याच्याकडे राजकीय सत्ता आहे त्याच्याकडे अधिक राजकीय सत्ता असेल.

    राजकीय सत्ता असलेल्या कुटुंबांकडे अधिक राजकीय सत्ता असण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही कदाचित विचाराल, बुश कुटुंबाचे दोन अमेरिकन राष्ट्रपती का असावे? केनेडी कुटुंबाचे दोन राष्ट्रपती का असावे?

    काही इतर कुटुंबांतून देखील काही प्रसिद्ध राजकारणी किंवा राष्ट्रपती निघावेत असे आपल्याला वाटते. परंतु, आधीपासूनच प्रसिद्ध असलेल्या कुटुंबातून आणखी काही राष्ट्रपती बाहेर निघण्याची अधिक शक्यता आहे.

    ५. ज्याच्याकडे शिक्षण आहे तो अधिक शिक्षण घेईल.

    वकील आणि डॉक्टर यांच्या कुटुंबातून आणखी वकील आणि डॉक्टरांना जन्म मिळण्याची अधिक शक्यता असते. अशिक्षित आणि खेडेगावातील एखादे कुटुंब वकील, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ बनतील अशा मुलांना जन्म देतील हे अशक्य वाटते. 

    त्यामुळे शास्त्रवचन पुन्हा पूर्ण झाले आहे. ज्याच्या कुटुंबातील लोक शिक्षित आहेत त्याच्या कुटुंबात आणखी सुशिक्षित लोकांची भर पडते. ज्याच्या कुटुंबात शिक्षित लोक नाहीत, तो जे आहेत त्यांना देखील गमावतो असे दिसून येते.

    ६. ज्याला उच्च पदी असलेले मित्र आहेत त्याचे आणखी मित्र होतील.

    जो महत्त्वाच्या लोकांना ओळखतो, तो जशीजशी वर्षे निघून जातील तसे आणखी महत्त्वाच्या लोकांना ओळखेल. ग्रामीण भागातील एखादा गरीब किंवा अशिक्षित निराश्रित व्यक्ती कोणत्याही अभियंत्याला, डॉक्टराला किंवा वकीलाला ओळखत नाही, पुढच्या वर्षापर्यंत एक महत्त्वाचा व्यक्ती त्याच्या ओळखीचा असण्याची शक्यता कमी असते. खरे पाहता, त्याच्या गरिबीमुळे, लोक त्याच्यामधील स्वारस्य कमी करू शकतात आणि अशाप्रकारे त्याचे मित्र कमी होऊ शकतात.

    ७. जो प्रसिद्ध आहे तो अधिक प्रसिद्ध होईल

    जो कोणी प्रसिद्ध आहे त्याने तो जे करत आहे ते करणे चालू ठेवले, तर तो आणखी जास्त प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. खेडेगावातील एखादी अज्ञात व्यक्ती येणाऱ्या वर्षात प्रसिद्ध होईल याची शक्यता नाही.

    ज्याच्याकडे आध्यात्मिक गोष्टी आहेत

    १.  ज्याच्याकडे देवाबद्दलचे ज्ञान आहे तो या ज्ञानामध्ये वाढण्याची अधिक शक्यता असते.

    तो व्यक्ती देवाचे ज्ञान आणि देवाच्या भयात वाढण्याची शक्यता आहे. जे लोक अभिषिक्त आहेत ते येणाऱ्या वर्षांत आणखी अभिषिक्त होतात.

    २. ज्या सुवार्तिकाने अनेक आत्मे जिंकले आहेत तो येणाऱ्या वर्षात अधिक आत्म्यांना

    जिंकण्याची शक्यता आहे. ज्याने सभा घेतल्या आहेत तो अधिक जास्त सभा घेईल तर जो सुवार्तिक कमी लोकांना उपदेश करतो त्याला त्याच्या लहान सभेतील लोकांची उपस्थिति कमी होत असल्याचा अनुभव येईल. मंडळीतील एक तरुण ज्याने आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनात फक्त एकच आत्मा जिंकला आहे, तो या वर्षी एखादा आत्मा जिंकेल ही शक्यता नाही.

    ३. ज्या पाळकाकडे एक मोठी मंडळी आहे त्याच्याकडे येणाऱ्या वर्षांत मोठी मंडळी

    असण्याची शक्यता आहे. ज्या पाळकाकडे एक मोठी मंडळी आहे त्याच्याकडे आणखी मोठी मंडळी असण्याची शक्यता असते. लहान मंडळी आणखी लहान होण्याची शक्यता असते. एक लहान मंडळी मोठ्या मंडळीच्या तुलनेत तिचे सदस्य गमावते आणि बंद होण्याच्या स्थितीत येते.

    ४. देवाचा अभिषिक्त सेवक अधिक दानांनी भरतो आणि अधिक अभिषिक्त बनत जात

    असल्याचे दिसून येते. ते बाहेर पडून प्रभूसाठी अधिक कार्य करण्याचा प्रयत्न करतात असे दिसते. ज्या लोकांकडे दाने नाहीत ते कमी आकर्षक होत असल्याचे दिसते. त्यांचा कल अगदी अधिक  अभिषिक्त होण्याकडे असतो.

    ५. ज्या पाळकांकडे मंडळीच्या इमारती आहेत, ते आणखी इमारती बांधत असल्याचे दिसून

    येते. ज्यांच्याकडे उपासनेसाठी जागा नाही, त्यांना त्यांच्या भाड्याच्या जागेच्या मालकाकडून काढून टाकल्या जाण्याच्या धमक्या मिळत असल्याचे दिसून येते. मंडळीमधील सदस्य लहान मंडळ्यांकडून मोठ्या मंडळ्यांकडे मोठ्या संख्येने जात असल्याचे दिसून येते, आणि ते लहान मंडळ्यांना आणखी लहान करतात.

    ६. ज्या मंडळ्यांचे आर्थिक उत्पन्न फार आहे त्यांचे आर्थिक उत्पन्न येणाऱ्या वर्षांत जास्त

    होण्याची शक्यता असते. कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या मंडळ्या त्यांच्या सदस्यांना गमावतात आणि येणाऱ्या वर्षातील त्यांचे आर्थिक उत्पन्न कमी होत जाण्याची संभावना असते.

    ७. सुवार्तेचे सेवक ज्यांनी अनेकांना आणि भावी पुढाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे ते आणखी

    पुढाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची शक्यता असते. ज्या लोकांनी कधीच पुढाऱ्यांना प्रशिक्षित केलेले नाही, त्यांच्याकडे उत्तराधिकारी असतील याची शक्यता कमी असते.

    असे का होते?

     ज्याला आहे त्याला दिले जाईल, हे येशूचे विधान इतके खरे कसे काय आहे?

    ज्याला आहे त्याच्याकडे अधिक का असेल असे

    ज्यांच्याकडे आहे त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे ते त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीसाठी योग्य बनले. सहसा ज्यांच्याकडे आहे ते निरंतर वृद्धीच्या समान तत्त्वाचा अभ्यास करत राहतात.

    ज्याला नाही तो त्याच्याकडे असेल नसेल तेही का गमावेल

    ते दहा हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्या जवळ दहा हजार रुपये आहेत त्याला द्या.

    मत्तय २५:२८

    ज्यांच्याकडे फारसे काही नाही ते काही विशिष्ट तत्त्वांचे पालन करीत नाहीत किंवा श्रीमंतीकडे नेणाऱ्या अशा काही विशिष्ट संकल्पनांचे अनुसरण करत नाहीत. सहसा, ज्यांच्याकडे नाही ते त्यांना ज्या वाईट तत्त्वांनी आणि कल्पनांनी त्यांच्या विद्यमान गरीब परिस्थितीत आणले आहे ते त्याच वाईट तत्त्वांचे आणि कल्पनांचे पालन करणे चालू ठेवतात. यामुळे त्यांचे दारिद्र्य वाढते आणि त्यांची समस्या आणखीच गुंतागुंतीची बनत जाते.

    अफ्रिकन देश आणि त्याच्या अर्थव्यवस्थेवर टाकलेला एक शीघ्र दृष्टीक्षेप प्रकट करतो की पन्नास वर्षांपूर्वी या देशाची जी गरिबी होती ती आता अधिक क्लिष्ट आणि दृढ झाली आहे. जर अफ्रिकेला तिच्या वसाहत दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी एक चमत्कार घडला असेल, तर आता अफ्रिकेला

    तिच्या विद्यमान स्थितीतून वर काढण्यासाठी आणखी हजार चमत्कारांची गरज आहे. याचे कारण असे की अफ्रिकेच्या अडचणी आणि आव्हाने वाढली आहेत, ती बहुगुणीत झाली आहेत आणि जटिल समस्यांमध्ये विकसित झाली आहेत, त्यांच्यावरील उपाय देखील अतिशय जटिल आहेत.

    जी सेवा आर्थिक संकटे आणि निर्धनता यासारख्या समस्यांशी संघर्ष करते, तिच्या समस्या इतक्या वाढतात की त्या नैसर्गिक डोळ्यांनी दिसणे अशक्य होतात. बऱ्याचदा, त्यांच्या समस्या गहन, क्लिष्ट आणि दीर्घकालीन असतात. या समस्या अनेकदा क्लिष्ट समस्यांची गुंतागुंत असते. म्हणूनच येशूने म्हटले आहे की: ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याच्याकडे जे आहे ते देखील गमावेल.

    आपण काय केले पाहिजे?

    आता आपण काय केले पाहिजे? आपण आपल्या जगात अस्तित्वात असलेल्या असमानतांच्या कारणांना प्रामाणिकपणे ओळखले पाहिजे - मग ते आध्यात्मिक जग असो किंवा आर्थिक जग असो. आपण जे मोठे फरक पाहतो ते ज्या लहान फरकांपासून बनतात त्यांना आपण ओळखले पाहिजे. आपण ज्याला आहे  पासून जो धडा शिकलो त्याचे लागूकरण आपण स्वत:साठी केलेच पाहिजे. असे कोणतेच साधन नाही जे आपल्याला लगेच गरिबीतून श्रीमंतीकडे नेईल.

    हे समृद्धीचे पुस्तक नाही. समृद्धीबद्दल पुस्तके असणे यात काहीच चुकीचे नाही. मी समृद्धीवर विश्वास ठेवतो. परंतु तुम्ही वाचत असलेले हे एक असे पुस्तक आहे जे येशूच्या गूढ शब्दांना समजून घेण्यासाठी या सर्वांच्या पुढे आहे: ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल. तुम्ही या पुस्तकातील तत्त्वे लागू केली तर तुम्ही ज्याला आहे असे व्हाल.

    आश्चर्याची गोष्ट म्हणजे, धर्मनिरपेक्ष संशोधकांनी केलेला अभ्यास येशूचे शब्द सत्य असल्याची पुष्टी देतो. धर्मनिरपेक्ष लोकांनी शोध लावलेल्या गोष्टींचे बारकाईने केलेले निरीक्षण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही तो त्याच्याकडे आहे ते देखील गमावेल, हे समजून घेण्यासाठी फार उपयुक्त आहे.

    येशूचे शब्द सुस्पष्ट आहेत. अगदी संशोधन न करता, येशूचे शब्द हे असे शब्द आहेत जे या जगात आहे आणि नाही चा उदय कसा झाला याचे स्पष्टीकरण देतात.

    या पुस्तकात प्रकट केलेल्या ज्ञानाला आणि सुज्ञतेला तुच्छ मानू नका. हे गंभीरतेने घ्या कारण देवाचा आत्मा हा ज्ञानाचा आत्मा आहे.

    खरंच, येशूच्या ज्ञानासारखे दुसरे कोणतेच ज्ञान नाही आणि त्याच्या वचनांसारखी दुसरी वचने नाहीत. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु तुम्हांला येशूची ही वचने नेहमी अटळ असल्याचे दिसून येईल. ज्यांच्याकडे आहे त्यांना आणखी प्राप्त होते आणि ज्यांच्याकडे नाही ते त्यांच्याकडे जे थोडेफार आहे ते देखील गमवतात.

    अध्याय २

    ज्याला आहे त्याला आणखी मिळेल कारण त्याच्याकडे सकारात्मक गुण  आणि मनोवृत्ती आहे

    ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, 

    ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, 

    सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला; 

    कारण हे गुण तुमच्यामध्ये असून वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील. 

    २ पेत्र. २:५-८

    उपरोक्त शास्त्रवचन आपल्याला हे दाखवून देते की जर तुमच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी आहेत तर तुम्ही नापीक, निष्फळ किंवा अनुत्पादक होणार नाही. ज्या गोष्टींचा पेत्र उल्लेख करत आहे ते सकारात्मक गुण आहेत जसे की प्रयत्न करणे, विश्वास, सात्त्विकता, इंद्रियदमन इत्यादि. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील हेच ते सकारात्मक गुणधर्म आहेत ज्यामुळे फलदायीपणा किंवा उत्पादकता निर्माण होते.

    एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील हेच ते सकारात्मक गुणधर्म आहेत जे त्याला निष्फळ, अनुत्पादक आणि असमृद्ध क्षेत्रातून बाहेर काढतात. नापीकपणा खूपच थोड्या प्रमाणात उत्पादकता असलेल्या जमिनीला दर्शवतो. ज्याला नाही त्याची कोरडी व नापीक भूमी ही त्या व्यक्तीमधील विशिष्ट सकारात्मक गुणांच्या अभावाची साक्ष देतात. अशा व्यक्तीमध्ये कोणते सकारात्मक गुणधर्म असतात जे त्याला ज्याला आहे असे बनवतात? हा अध्याय याबद्दलच आहे. फलदायीपणा, उत्पादकता आणि विपुलतेशी संबंधित नऊ महत्त्वाचे सकारात्मक गुण आहेत.

    ह्या सकारात्मक गुणाचे वर्णन देवाच्या वचनात आणि वरील परिच्छेदात केले गेले आहे. ते असे वैयक्तिक गुण आहेत जे कोणालाही समृद्ध करतात.

    हे वैयक्तिक गुण ओळखले पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि तुमच्यामध्ये ते विकसित केले गेले पाहिजे जेणेकरून तुम्ही ज्याला आहे असे बनू शकता. पवित्रशास्त्र आपल्याला शिकवते की एकदा का हे सकारात्मक गुण आपल्या मध्ये आलेत तर त्यानंतर निष्फळपणा, नापीकपणा किंवा दारिद्र्य असणार नाही.

    सकारात्मक गुण आहेत प्रयत्न करणे, विश्वास, सात्त्विकता, ज्ञान, इंद्रियदमन, धीर, सुभक्ती, बंधुप्रेम आणि प्रीती. हे गुण फार महत्त्वाचे आहेत म्हणून आपल्याला त्या प्रत्येकाबद्दल काही गोष्टी माहित असल्या पाहिजे आणि ते कसे कार्य करतात हे आपण समजून घेणे आवश्यक आहे.

    सकारात्मक गुण: प्रयत्नशीलता

    प्रयत्नशीलता ची व्याख्या: एखाद्या व्यक्तीकडून समस्येचे निराकरण करण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी आणि उत्कृष्ट गोष्टी साध्य करण्यासाठी सतत आणि अविरत प्रयत्न केले जातात त्याला प्रयत्नशीलता म्हणतात. 

    प्रयत्नशीलतेविषयी तुम्हांला चार गोष्टी माहित असायला पाहिजे

    १. प्रयत्नशीलता हा एक वैयक्तिक गुण आहे जो व्यक्तीला समृद्ध बनवितो.

    जवळजवळ प्रत्येक श्रीमंत व्यक्ती प्रयत्नशील व्यक्ती आहे.

    सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उदयोगाचा हात धन मिळवतो.

    नीतिसूत्रे १०:४

    २. प्रयत्नशीलता हा एक वैयक्तिक गुण आहे जो व्यक्तीला पुढारी बनवितो. बहुतेक पुढारी  श्रीमंत आणि समृद्ध आहेत कारण ते ज्यांचे नेतृत्व करतात त्या सर्वांच्या आघाडीवर आहेत.

    उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.

    नीतिसूत्रे १२:२४

    ३. प्रयत्नशीलता हा एक वैयक्तिक गुण आहे ज्यामुळे व्यक्तीच्या मनात विपुलता आणि संपत्तीकडे नेणाऱ्या कल्पना निर्माण होतात.

    उद्योग्याचे विचार समृद्ध करणारे असतात. जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. 

    नीतिसूत्रे

    Enjoying the preview?
    Page 1 of 1