Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान
आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान
आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान
Ebook184 pages50 minutes

आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

जीवमात्र काय शोधत असतो? सुख शोधत असतो, परंतु घटक्याभरासाठी सुद्धा सुख मिळत नाही. लग्न कार्यात गेलो किंवा नाटकात गेलो तरी पुन्हा दु:ख हे येतेच. ज्या सुखानंतर दु:ख येत असेल, त्यास सुख म्हणायचेच कसे? ते तर मूर्छेचे सुख म्हटले जाईल, सुख तर परमनन्ट असते. हे तर टेम्पररी सुख आहे, आणि कल्पित आहे, मानलेले सुख आहे. प्रत्येक जीव काय शोधत असतो? कायमचे सुख, शाश्वत सुख शोधत असतो, ते याच्यातून मिळेल, त्याच्यातून मिळेल, हे घेऊ, असे करु, बंगला बांधू तर सुख मिळेल, गाडी घेतली तर सुख मिळेल, असे करतच राहतो. परंतु काहीच मिळत नाही. उलट या जंजाळात अधिक फसला जातो. सुख तर आतच आहे, आत्म्यातच आहे. म्हणून जेव्हा आत्मा प्राप्त होईल तेव्हाच सनातन (सुख) प्राप्त होईल.

Languageमराठी
Release dateFeb 9, 2019
ISBN9789386321947
आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

Read more from दादा भगवान

Related to आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

Related ebooks

Reviews for आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    आत्मसाक्षात्कार प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान - दादा भगवान

    www.dadabhagwan.org

    ज्ञानी पुरुष परम पूज्य दादा भगवान यांची दिव्य ज्ञानवाणी

    संकलन : पूज्यश्री दीपकभाई देसाई

    आत्मसाक्षात्कार

    प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

    अनुवाद : महात्मागण

    दादा भगवान कोण?

    जून 1958 संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले ‘दादा भगवान’ संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.

    त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भुत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट!

    ते स्वत: प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण?’ याबद्द्लची फोड करून देताना म्हणायचे की, ‘‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत. हे तर‘ए.एम. पटेल’ आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर ‘चौदालोका’चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि ‘येथे’ माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रकट झालेले ‘दादा भगवान’ यांना मी पण नमस्कार करतो.’’

    व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत.

    आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक

    परम पूज्य दादा भगवान (दादाश्री) यांना 1958 मध्ये आत्मज्ञान प्रकट झाले. त्यानंतर 1962 ते 1988 पर्यंत देश-विदेश परिभ्रमण करून मुमुक्षुंना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत.

    दादाश्रींनी आपल्या हयातीतच आत्मज्ञानी पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षुंना सत्संग व आत्मज्ञान प्राप्ती निमित्त भावाने करवित असत.

    आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई देसाई यांना सुद्धा दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. वर्तमानात पूज्य नीरूमांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात निमित्तभावाने आत्मज्ञान प्राप्ती करवित आहेत.

    या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदा:या सांभाळत असताना सुद्धा आतून मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत.

    अक्रम विज्ञान

    आत्मसाक्षात्कार

    प्राप्तीचे सरळ आणि अचूक विज्ञान

    1. मनुष्य जीवनाचे ध्येय काय?

    हे तर संपूर्ण जीवनच फ्रॅक्चर झाले आहे. कशासाठी जगत आहोत याचेसुद्धा भान नाही. ध्येय नसलेले जीवन याला काही अर्थच नाही. पैसे येतात आणि खाऊन पिऊन मजा करायची आणि दिवसभर चिंता-काळजी करत राहायची याला जीवनाचे ध्येय कसे म्हणता येईल? दुर्मिळ मनुष्य जन्म आहे तो असा वाया घालविण्यात काय अर्थ आहे? तर मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर स्वत:च्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करायला हवे? सांसारिक सुखे, भौतिक सुखे हवे असतील तर तुमच्याजवळ जे काही असेल ते लोकांमध्ये वाटत रहा.

    या जगाचा नियम एकाच वाक्यात समजून घ्या, या जगातील सर्व धर्मांचे सार हेच आहे की ‘जर तुम्हाला सुख हवे असेल तर इतर जीवांना सुख द्या आणि दु:ख हवे असेल तर दु:ख द्या.’ तुम्हाला जे अनुकूल असेल ते द्या. आता कोणी म्हणेल की आम्ही इतरांना सुख कसे द्यायचे, आमच्याजवळ पैसे तर नाही. तेव्हा फक्त पैश्यांनीच सुख देता येते असे थोडेच आहे, तर त्यांच्याप्रती तुम्ही ऑब्लाइजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) ठेवू शकता, त्याला काही आणायचे असेल तर आणून देऊ शकता. त्याला चांगला सल्ला देऊ शकता. असे पुष्कळ मार्ग आहेत ऑब्लाइज करण्यासाठी.

    दोन प्रकारचे ध्येय, सांसारिक आणि आत्यंतिक

    दोन प्रकारचे ध्येय निश्चित केले पाहिजेत. आपण संसारात असे जगावे की आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये, कोणासही दु:ख होऊ नये. अशा प्रकारे आपण उत्तम सत्संगी पुरुष, ख:या पुरुषांच्या सहवासात राहावे, आणि कुसंगामध्ये पडू नये, असे काही ध्येय असायला हवे. आणि दुस:या प्रकारच्या ध्येयामध्ये प्रत्यक्ष ‘ज्ञानी पुरुष’ भेटले तर (त्यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून) त्यांच्या सत्संगात राहावे, त्यामुळे तुमची सर्व कामे होतील, सर्व कोडी सोडवली जातील (आणि मोक्ष प्राप्त होईल).

    म्हणजे मनुष्याचे अंतिम ध्येय काय असावे? मोक्षाला जाण्याचेच! हेच ध्येय असायला हवे. तुम्हालाही मोक्षाला जायचे आहे ना? कुठपर्यंत भटकायचे? अनंत जन्मांपासून भटकभटक... भटकण्यात काहीच बाकी ठेवले नाही ना! कशामुळे भटकणे झाले? कारण ‘मी कोण आहे’ हेच जाणले नाही. स्वत:चे स्वरूपच ओळखले नाही. स्वत:चे स्वरूप ओळखले पाहिजे. ‘स्वत: कोण आहे’ याची ओळख करायला नको का? इतके भटकल्यानंतरही तुम्हाला ते ओळखता आले नाही? केवळ पैसे कमावण्याच्या मागे लागलात? मोक्षासाठीही थोडेफार काही

    Enjoying the preview?
    Page 1 of 1